Tuesday, March 7, 2017

होळीला नेमके काय करायचे

!!!श्री स्वामी समर्थ !!!!

*होळीला नेमके काय करायचे?*

■ घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप, ११लवंग, ७ बत्तासे, ५ विडयाची पाने, गोटा खोबरे नारळ,पुरणाची पोळी,वरणभात नैवेद्य, असे सर्व घेऊन होळीची पुजा करावी.


■ ११ प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ,तूप वाहावे.,नैवद्य दाखवावा, प्रार्थना करावी.यामुळे सुख समृद्धी वाढते,कष्ट दुर होतात.

■ होळीच्या दिवशी काळ्या कपडयात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्याखिशात ठेवावेत.व रात्री होळीत प्रवाहित करावेत. त्रास निघून जातो.

■ ७ गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रु माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये. माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित. होऊदे असे म्हणून होळीत टाकावीत.

■ होळीच्या दुसरया दिवशी होळीची राख घरी आणुन त्यात थोडेसे मीठ,व राई,मिक्स करुन घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भुतप्रेत,नजरदोष,करणीदोष होत नाही.

■ होळीच्या दिवसा पासून रोज ४० दिवसा पर्यत बजरंग बाणाचे रोज ३पाठ करावेत मनामोकामना पुर्ण होते.

■ होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला २१गोमती चक्र वाहावेत, व्यापार व नोकरी मध्ये उन्नती होते.

■ नवग्रह दोष जाण्या साठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे.व शिवलिंगास भस्म म्हणून लावावेगरीबास पुरणपोळी खावू घालावी,घरी चौमुखी दिवा लावावा. सर्वदेवाची पुजा करावी. यामुळे बाधा निवारण होते.

■ राहुचा दोष असेल तर - एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडेतेल भरुन थोडा गुळ टाकावा.व तो नारळ अंगावरून ७ वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहुचा त्रास,दोष निघून जातो.व सर्व अडलेली कामे होऊ लागतात.

■ जर नेहमी धनहानी होत असेल,पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका व व्दिमुखी दीवा लावा त्या दिव्यात ११ काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा ,आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका.हि क्रिया श्रध्देने करा.

■ दुर्घटना, संकटे,फार येत असतील तर होळीच्या दिवशी ५ लाल गुंजा ५ काळ्या गुंजा व १ नारळ घेऊन,होळीला ११प्रदक्षिणा माराव्यात व नंतर.या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरुन होळीत टाकाव्यात .

■ विवाह होत नाही,लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे.या दिवशी २ विडयाची पाने,१ अख्खी सुपारी ,१ हळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण. करावे,प्रार्थनाकरावी व या नंतर होळीचे दर्शन घ्यावे.
व हीच क्रिया दुसरया दिवशी धुलीवंदनाला ही करावी.
ते रोज रंगपंचमी पर्यत करावी लवकरच विवाहयोग येईल...!!!!
*श्री स्वामी समर्थ*!!!!!!!!