Thursday, April 27, 2017

।श्रीदत्त स्तोत्र।।



।श्रीदत्त स्तोत्र।।


।।जटाधरं पांडुरंगं शुल हस्तं कृपानिधीं
सर्व रोग हरं देवं दत्तात्रेयं अहं भजे ।।
ॐ अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद रृषि:
अनुष्टुप छंद:श्रीदत्त:परमात्मा देवता श्रीदत्त प्रीत्यर्थं जपे विनियोग:
जगत् उत्पत्ती कर्तेच स्थितीसंहार हेतवे
भवपाश विमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते ।।

जराजन्म विनाशाय देह़ुद्धीकराय च
दिगंबर दयामुर्ते दत्तात्रेय नमोस्तुते ।।

कर्पुर कांतिदेहाय ब्रम्हमुर्तिधराय च
वेदशास्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते। ।।

हृस्वदीर्धकृशस्थुल नामगोत्रविवर्जित
पंचभुतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोस्तुते ।।

यज्ञभौक्त्रै च यज्ञाय यज्ञरुपधराय च
यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोस्तुते ।।

आदौ ब्रम्हा मध्ये विष्णुरन्ते देव: सदाशिव:
मुर्तित्रयस्वरुपाय दत्तात्रेय नमोस्तुते। ।।

भोगाललाय भोगाय योग्ययोग्याय धारिणे
जितेंद्रिय जितज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते ।।

दिगंबराय दिव्याय दिव्यरुपधराय च 
सदोदित परब्रम्ह दत्तात्रेय नमोस्तुते। ।।

जम्बुद्वीपे महाक्षेत्रे मातापुर निवासिने
जयमान:सतां देव दत्तात्रेय नमोस्तुते ।।

भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे
नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोस्तुते ।।

ब्रम्हज्ञानमयीमुद्रा वस्त्रे चाकाशभुतले
प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोस्तुते। ।।

अवधूत सदानंद परब्रम्ह स्वरूपिणे
विदेह देह रूपाय दत्तात्येय नमोस्तुते। ।।

सत्यरूप सदाचार सत्यधर्म परायण
सत्याश्रय परोक्षाय दत्तात्रेय नमोस्तुते ।।

शुलहस्ते गदापाणे वनमालासुकन्धर
यज्ञसुत्रधर ब्रम्हन् दत्तात्रेय नमोस्तुते ।।

क्षराक्षरस्वरुपाय परात्परतराय च
जत्तमुक्ति परस्तोत्र दत्तात्रेय नमोस्तुते ।।

दत्तविद्याय लक्ष्मीश दत्तस्वात्म स्वरूपिने
गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते। ।।

शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकमं
सर्व पापशमं याती दत्तात्रेय नमोस्तुते ।।

इदं स्तोत्रं महाद्दिव्यं दत्तप्रत्यक्षकारकमं
दत्तात्रेय प्रसादाश्च नारदेन प्रकिर्तितं। ।।

इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं
श्रीदत्तात्रेय स्तोत्रं संपुर्णमं।।

Tuesday, March 7, 2017

होळीला नेमके काय करायचे

!!!श्री स्वामी समर्थ !!!!

*होळीला नेमके काय करायचे?*

■ घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप, ११लवंग, ७ बत्तासे, ५ विडयाची पाने, गोटा खोबरे नारळ,पुरणाची पोळी,वरणभात नैवेद्य, असे सर्व घेऊन होळीची पुजा करावी.


■ ११ प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ,तूप वाहावे.,नैवद्य दाखवावा, प्रार्थना करावी.यामुळे सुख समृद्धी वाढते,कष्ट दुर होतात.

■ होळीच्या दिवशी काळ्या कपडयात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्याखिशात ठेवावेत.व रात्री होळीत प्रवाहित करावेत. त्रास निघून जातो.

■ ७ गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रु माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये. माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित. होऊदे असे म्हणून होळीत टाकावीत.

■ होळीच्या दुसरया दिवशी होळीची राख घरी आणुन त्यात थोडेसे मीठ,व राई,मिक्स करुन घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भुतप्रेत,नजरदोष,करणीदोष होत नाही.

■ होळीच्या दिवसा पासून रोज ४० दिवसा पर्यत बजरंग बाणाचे रोज ३पाठ करावेत मनामोकामना पुर्ण होते.

■ होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला २१गोमती चक्र वाहावेत, व्यापार व नोकरी मध्ये उन्नती होते.

■ नवग्रह दोष जाण्या साठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे.व शिवलिंगास भस्म म्हणून लावावेगरीबास पुरणपोळी खावू घालावी,घरी चौमुखी दिवा लावावा. सर्वदेवाची पुजा करावी. यामुळे बाधा निवारण होते.

■ राहुचा दोष असेल तर - एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडेतेल भरुन थोडा गुळ टाकावा.व तो नारळ अंगावरून ७ वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहुचा त्रास,दोष निघून जातो.व सर्व अडलेली कामे होऊ लागतात.

■ जर नेहमी धनहानी होत असेल,पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका व व्दिमुखी दीवा लावा त्या दिव्यात ११ काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा ,आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका.हि क्रिया श्रध्देने करा.

■ दुर्घटना, संकटे,फार येत असतील तर होळीच्या दिवशी ५ लाल गुंजा ५ काळ्या गुंजा व १ नारळ घेऊन,होळीला ११प्रदक्षिणा माराव्यात व नंतर.या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरुन होळीत टाकाव्यात .

■ विवाह होत नाही,लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे.या दिवशी २ विडयाची पाने,१ अख्खी सुपारी ,१ हळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण. करावे,प्रार्थनाकरावी व या नंतर होळीचे दर्शन घ्यावे.
व हीच क्रिया दुसरया दिवशी धुलीवंदनाला ही करावी.
ते रोज रंगपंचमी पर्यत करावी लवकरच विवाहयोग येईल...!!!!
*श्री स्वामी समर्थ*!!!!!!!!

Friday, February 17, 2017

टेंब्ये स्वामी महाराजानी रचलेल्या स्तोत्रांचे फलित

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजानी रचलेल्या स्तोत्रांचे फलित –

१. घोरकष्टोध्दरण स्तोत्र - आकस्मिक अरिष्टाचे (संकटाचे) निवारण करणारे आणि भक्तीवात्सल्याने ओतप्रोत भरलेले स्तोत्र म्हणजे आपत्ती निवारणाच्या आध्यात्मिक स्वरूपाचे प्रात्यक्षिकच आहे.

२. श्रीदत्तमाला मंत्र - रोज मनोभावे कमीत कमी १०८ वेळा जपला असता मानवी देहाचेच तीर्थक्षेत्र होते.

३. श्री दत्तात्रेय कवच - सर्व शारीरिक संरक्षण.

४. श्री दत्तस्तोत्र - राग कमी होणे, मनशांती व रक्तदाबाचा विकार कमी होणे.

५. श्रीपादवल्लभस्तोत्र - देहरुपी श्रीसदगुरुप्राप्तीसाठी.

६. अपराधक्षमापनस्तुति - नित्य पूजा केल्यानंतर म्हणावयाचे स्तोत्र.

७. श्री दत्तभावसुधारसस्तोत्र - पूर्ण वाचनाने श्रीगुरुचरित्र वाचनाचे फल मिळते.

(मंत्र क्रं ६३ भगवदभक्त संतान होण्यासाठी व मंत्र क्रं ६६ पोटदुखी कमी होण्यासाठी असे सांगितले आहे.)

८. श्री सप्तशतीगुरुचरित्र - घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.

९. श्री दत्तलीलामृताब्धिसार - घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.

१०. श्री दत्तमाहात्म्य - घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.

११. वासुदेवमननसार - प्रपंचामध्ये राहून अध्यात्म कसे साधावे.

१२. सार्थ बालाशिषस्तोत्र - कुमाराना क कुमारिकांना दृष्ट, नजर लागू नये व अर्भकांना ग्रहादि पीडा पासून
मुक्त करणारे.
१३. मंत्रात्मक श्लोक - जप कसा करावा, कर्ज निवारण्याचा व सौभाग्याचा मंत्र..

१४. चाक्षुषोपनिषद - डोळ्यांचे सर्व विकार व नंबर कमी होण्यासाठी व वंशामध्ये कोणालाही नेत्रविकार न होण्यासाठी.

१५. मेशं केशं सुशम्भुं भुवनवनवहं मारहं रत्न रत्नं । वन्दे श्री देवदेवं सुगुणगुरुगुरुं श्रीकरं कंज कंजम ।।
अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त

Saturday, February 4, 2017

१८ पुराणांची थोडक्यात माहिती

अठरा पुराणांची नांवे-

मत्स्यपुराण, वायुपुराण, भागवतपुराण, विष्णूपुराण, गरुडपुराण, ब्रह्मपुराण, नारदपुराण, वामनपुराण, कुर्मपुराण, पद्मपुराण, स्कंदपुराण, मार्कंडयपुराण, शिवपुराण, अग्नीपुराण, वराहपुराण, ब्रम्हांडपुराण, ब्रह्मावैवस्वतपुराण आणि भविष्यपुराण

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

१८ पुराणांची थोडक्यात माहिती......

१. मत्स्यपुराण : भगवान विष्णूने मत्स्यरूपाने मनूला सांगितलेले हे पुराण इ.स.च्या दुसऱ्या ते चौथ्या शतकांच्या दरम्यान तयार झाले असावे आणि त्याचा मूळचा भाग इ.स.पू ६००ते ३०० च्या दरम्यानचा असावा, असे म्हणतात. दक्षिण भारत, आंध्र प्रदेश, नासिक वा नर्मदातीर या ठिकाणी ते लिहिले गेले असावे, अशी मते आढळतात. याचे २९१ अध्याय असून श्लोक सु. १४-१५ हजार आहेत. स्वल्पमत्स्यपुराण या नावाने याचे एक संक्षिप्त स्वरूपही आढळते. यात फार कमी प्रमाणात भर पडलेली असून यातील राजवंशाची हकिकत विश्वसनीय आहे. याच्या ५३ व्या अध्यायात सर्व पुराणांची विषयानुक्रमणी आलेली आहे. यात वितृवंश, ऋषिवंश, राजवंश, राजधर्म, हिमालय, तीर्थे इ. विषयांचे वर्णन प्रामुख्याने आलेले आहे.

२. वायूपुराण : वायूने सांगितल्यामुळे वायुपुराण म्हटले जाणारे हे पुराण सर्वात जुने आहे, असे डॉ. भांडारकरांचे मत असून काहीजणांनी त्याचा काळ सु.इ.स.३०० हा मानलेला आहे. प्रक्रिय, उपोदघात, अनुषंग आणि उपसंहार या चार पादांत विभागलेल्या या पुराणात ११२ अध्याय असून त्याची श्लोकसंख्या सू.११ हजार आहे. यात पंचलक्षणे स्पष्टपणे आढळत असून पाशुपतयोग, गयातीर्थ इत्यादींचीही वर्णने आढळतात. यात शिवचरित्राचे विस्तृत वर्णन असून भौगोलिक वर्णनांसाठीही हे पुराण प्रसिद्ध आहे.

३. भागवतपुराण : भागवतधर्माचे विवेचन करणारे आणि सर्वश्रेष्ठ मानले जाणारे हे पुराण अत्यंत लोकप्रिय आहे. ते व्यासांनी आपला पुत्र शुक याला सांगितले, असे म्हटले जाते. परंतु बोपदेव नावाच्या पंडिताने ते लिहिले, असेही एक मत आहे. त्याचा काळ इ.स.पू. तिसरे शतक, इ.स.चे पाचवे ते दहावे शतक, असा वेगवेगळा सांगितला जातो. हे पुराण दक्षिणेत तमिळनाडूमध्ये लिहिले गेले, असे मत आढळते. १२ स्कंधांत विभागलेल्या या पुराणात सु. १८ हजार श्लोक आहेत. हे पुराण दहा लक्षणांनी युक्त असून कृष्ण हा नायक आहे. भक्ती,तत्त्वज्ञान इ. दृष्टींनी ते महत्त्वाचे आहे. त्याचे भ्रमरगीत, रासपंचाध्यायी इ ,भाग प्रसिद्ध आहेत. इतर कोणत्याही पुराणापेक्षा त्यावर जास्त टीका झाल्या असून त्याची प्रादेशिक भाषांत व इंग्रजीतही भाषांतरे झाली आहेत. चातुर्मास्यात भागवतसप्ताह करण्याची पद्धत सर्व भारतात आहे.

४. विष्णूपुराण : विष्णूभक्तिला प्राधान्य दिल्यामुळे विष्णूचे नाव प्राप्त झालेले हे पुराण भागवतपुराणाखालोखाल महत्त्वाचे असून वैष्णवदर्शनांचा आधार मानले जाते. राक्षसांचा पूर्वज पुलस्त्य याच्या वरदानामुळे पराशराने हे पुराण रचले, असे म्हटले आहे. इ.स.च्या ३ ते ५ या शतकांच्या दरम्यान ते तयार झाले असावे, असे दिसते. बलदेव उपाध्यांच्या मते इ.स.पू. दुसरे शतक हा त्याचा काळ होय. हे पुराण सहा अंशांत विभागलेले असून त्याचे १२६ अध्याय आहेत. त्याच्या उपलब्ध प्रतीत सु. सहा-सात हजार श्लोक आहेत. या पुराणात फार कमी प्रमाणात फेरफार झाले आहेत. पंचलक्षणांचे या पुराणाइतके व्यवस्थित विवेचन बहुधा दुसऱ्या कोणत्याही पुराणात आढळत नाही.यात अनेक आख्यानांबरोबरच कृष्णचरित्रही वर्णिलेले आहे. विल्सनने या पुराणाचे इंग्रजीत केलेले भाषांतर प्रसिद्ध आहे.

५. गरुडपुराण : विष्णूच्या सांगण्यावरून गरुडाने या पुराणाद्वारे वैष्णव तत्त्वांचे वर्णन केले, म्हणून याला गरुडाचे नाव प्राप्त झाले. हे इ.स.च्या सातव्या चे दहाव्या शतकांत तयार झाले असावे, असे दिसते. डॉ हाझरा यांच्या मते हे मिथिलेत लिहिले गेले. याचे अध्याय २६४ असून श्लोक सु. ७ हजार आहेत. याच्या पूर्वखंडात व्याकरण, छंद साहित्य, वैद्यक इ. विषयांची माहिती असल्यामुळे हे विश्वकोशात्मक बनले आहे. याच्या उत्तरखंडाच्या 'प्रेतकल्पा' त और्ध्वदेहिराची माहिती आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर दहा दिवसपर्यंत घरी गरुडपुराणाचा पाठ करण्याची प्रथा आहे. याच्या उत्तरखंडाचे जर्मन भाषांतर झाले आहे.

६. ब्रह्मपुराण : ब्रह्मदेवाने दक्षाला सांगितल्यामुळे ब्रह्मपुराण म्हटले जाणारे हे पुराण पुराणांच्या यादीत पहिले असल्यामुळे त्याला 'आदिपुराण' म्हटले जाते. त्यात सूर्योपासना वर्णिलेली असल्यामुळे त्याला सौरपुराण असेही म्हणतात. आदिपुराण आणि सौरपुराण या नावांच्या उपपुराणांहून मात्र ते वेगळे आहे. आदिब्रह्यपुराण या नावाचे दुसरे एक पुराण असून ही दोन्ही पुराणे एकच असावीत, असे एक मत आहे. हे पुराण इ.स.च्या सातव्या-आठव्या शतकांपुर्वी बनले असावे आणि दहाव्या, बाराव्या व पंधराव्या शतकांत त्यात भर पडली असावी; त्याचा काही भाग ओरिसात, तर काही भाग दंडकारण्यात तयार झाला असावा इ. मते आढळतात.या पुराणात २४५ अध्याय असून सु. १४ हजार श्लोक आहेत. त्यात ओरिसातील तीर्थक्षेत्रे, कृष्णचरित्र, सांख्यतत्त्वज्ञान, वैदिक ग्रंथांतील उपाख्याने इ. महत्त्वाचे विषय आले आहेत. दंडकारण्यातील गौतमी नदी व तेथील तीर्थांचे माहात्म्य १०६ अध्यायांत आले आहे.

७. नारद पुराण : या पुराणाच्या स्वरूपाविषयी बरीच अनिश्चितता दिसते. नारदीय पुराण, नारदपुराण आणि बृहन्नारदीयपुराण अशी समान नावांची तीन पुराणे आढळतात. यांपैकी महापुराण कोणते, यांविषयी संदिग्धाच आहे. यात नारदाने विष्णूभक्तीचे वर्णन केले, म्हणून हे नारदीय पुराण होय. इ.स.७०० ते १००० या काळात ते तयार झाले, अशी मते आढळतात. याचे दोन भाग असून पूर्वभागात १२५ आणि उत्तरभागात ८२ अध्याय आहेत. यातील श्लोकसंख्या बलदेव उपाध्यायांच्या मते २५ हजार तर पां.वा. काणे यांच्या मते ५,५१३ इतकी आहे. याच्या ९२ ते १०९ या अध्यायांत १८ पुराणांची विस्तृत विषयानुक्रमणी आलेली असल्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या हे पुराण महत्त्वाचे आहे. यात अनेक विषय आलेले असल्यामुळे त्याचे स्वरूप बरेचसे विश्वकोशात्मक झाले आहे.

८. वामनपुराण : यात वामनावताराचे वर्णन विशेषत्वाने असून पहिल्या श्लोकात वामनालाच नमस्कार केलेला आहे. हे पुराण पुलस्त्य ऋषीने नारदाला सांगितले, अशी समजूत आहे. इ.स.च्या पहिल्या-दुसऱ्या वा सहाव्या ते नवव्या शतकांत हे पुराण तयार झाले असावे, अशी मते आढळतात. याची निर्मिती कुरुक्षेत्राला परिसरात झाली असावी, असे दिसते. याच्या उपलब्ध प्रतींत ९५ अध्याय व सु. ६ हजार श्लोक आहेत.याचा उत्तर भाग लुप्त झाला आहे. यात शैव, कालदमन, पाशुपत व कापालिक अशा चार शैव संप्रदायाचे वर्णन असून वैष्णव व पाशूपत शैव या दोहोंना समान महत्त्व दिलेले आहे. यात असुरांच्या कथा असून शिवपार्वतीचे विस्तृत चरित्र आलेले आहे. कालिदासाचे कुमारसंभव व वामनपुराण यांत वरेच साम्य आढळते.

९. कूर्मपुराण : विष्णूने कूर्मावतारात इन्द्रद्युम्न राजाला हे पुराण सांगितले, अशी समजूत आहे. इ.स.च्या दुसऱ्याक, पाचव्या वा सहाव्या-सातव्या शतकांत ते तयार झाले असावे, अशी मते आहेत. याचे पूर्वार्ध (५३ अध्याय) व उत्तरार्ध(४६ अध्याय) असे दोन भाग असून उपलब्ध ग्रंथात सु.६ हजार श्लोक आहेत. नारदसूचीप्रमाणे याच्या ब्राह्मी, भागवती, सौरी व वैष्णवी अशा चार संहिता होत्या; परंतु सध्या फक्त ब्राह्मी संहिताच उपलब्ध आहे. याचे नाव वैष्णव असले, तरी हे शैवपुराण असल्यामुळे शिव व दुर्गा याचे माहात्म्य हेच याचे मुख्य विषय आहेत. यात पाखंड मते दिलेली असून वाममार्गीयांच्या यामलयंत्र या ग्रंथाची माहितीही दिलेली आहे. याच पुराणात 'ईश्वरगीता' व 'व्यासगीता' अशा दोन गीता आलेल्या आहेत. तेनकाशीच्या एका राजाने सोळाव्या शतकात या पुराणाचे तमिळमध्ये भाषांतर केलेले आहे.

१०.पद्मपुराण : या पुराणात ब्रह्मदेवाने पद्मातून विश्वनिर्मिती केल्याची कथा असल्यामुळे त्याला पद्म हे नाव मिळाले असून ते वैष्णवपुराणांत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ह्या पुराणाचा बराचसा भाग इ.स.च्या पाचव्या शतकानंतर बनलेला असला, तरी त्याचा काही भाग त्याही आधीचा आहे; आणि त्याचा उत्तरखंड मात्र सोळाव्या शतकानंतरच्या असावा, असे मत आढळते. बंगाली व देवनागरी अशा दोन प्रतींत आढळणारे हे पुराण सु ५५ हजार श्लोकांचे असून श्लोकसंख्येच्या बाबतीत ते स्कंदपुराणाखालोखाल आहे. ते सृष्टी, भूमी, स्वर्ग, पाताल व उत्तर अशा पाच खंडात विभागलेले असून त्याचे ६२८ अध्याय आहेत. देवनागरी प्रतीत मात्र त्याचे आदी, भूमी, ब्रह्मा, पाताल, सृष्टी व उत्तर असे सहा खंड मानले आहेत. पौराणिक देवता, मानव, नागसर्प, अप्सरा इत्यादींच्या कथा व तीर्थमाहात्म्ये हे विषय प्रामुख्याने आलेले आहेत.उत्तरखंडाला जोडलेले 'क्रियायोगसार' हे परिशिष्ट वैष्णवधर्माच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कालिदासाचे शांकुंतल हे नाटक या पुराणातील शाकुंतल उपाख्यानावर आधारलेले आहे, असे मानले जाते. पद्मपुराण या नावाची दोन जैन पुराणेही आढळतात.

११. स्कंदपुराण : स्कंदाने सांगितल्यामुळे त्याचे नाव मिळालेले हे पुराण इ.स.च्या सातव्या व नवव्या शतकांच्या दरम्यानचे असावे, असे म्हटले जाते.सर्व पुराणांत आकाराने मोठे असलेले हे पुराण ८१ हजार श्लोकांचे आहे. ते सनत्कुमार, सुत, शंकर, वैष्णव, ब्राह्मव सौर अशा सहा संहितांमध्ये विभागलेले असून माहेश्वर, वैष्णव, ब्राह्म, काशी, रेवा, तापी व प्रभास या सात खंडांतील दुसरीही एक विभागणी आढळते.याच्या सूतसंहितेत ब्रह्मगीता व सूतगीता आहेत, तर रेवाखंडांत सत्यनारायणव्रताची कथा आहे.

१२. मार्कंडेयपुराण : मार्कंडेय ऋषींनी सांगितल्यामुळे त्यांचे नाव प्राप्त झालेले हे पुराण अत्यंत प्राचीन असून त्याचा प्राचीन भाग इ. स. तिसऱ्या शतकाच्याही आधीचा असावा, असे म्हणतात. बलदेव उपाध्यायांच्या मते गुप्तकालीन संस्कृतीचे दर्शन घडविण्यारे हे पुराण गुप्तकाळात म्हणजे इ.स.च्या चौथ्या-पाचव्या शतकांत झाले असावे. ते गोदावरीच्या उगमप्रदेशांत लिहिले गेले असावे, असे मत आढळते.यात सामान्यतः पंचलक्षणे आढळत असून केवळ १३७ अध्यायांच्या या पुराणात सु. ६,९०० श्लोक आहेत. यात द्रौपदीचे पंचपतित्व, तिच्या अल्पवयीन मुलांची हत्या इ. प्रश्नांची चर्चा असून हरिचंद्र ब्रह्यवादिनी मदालसा, कृष्ण, मार्कंडेय इत्यादींच्या कथा आहेत. अग्नि,सूर्य, देवी इत्यादींची स्तोत्रे असून 'दुर्गासप्तशती' या नावाने विख्यात असलेले देवीमाहात्म्य १३ अध्यायांत वर्णिलेले आहे. पार्जिटरने याचे इंग्रजी भाषांतर केलेले असून प्रारंभीच्या काही अध्यायांचे जर्मन भाषेतही भाषांतर झाले आहे.

१३. लिंगपुराण : शिवाने अग्निलिंगात प्रवेश करून या पुराणाद्वारे मोक्षादींचे विवेचन केले, या समजुतीमुळे याला लिंगपुराण हे नाव मिळाले आहे. याचा काळ सु, सातवे-आठवे शतक असण्याची शक्यता आहे. याचे पूर्वार्ध व उत्तरार्धा असे दोन भाग असून, पूर्वार्धाचे १०८ व उत्तरार्धाचे ५५ अध्याय आहेत. त्यांपैकी उत्तरार्धाचे काही अध्याय गद्य आहेत. याची श्लोकसंख्या सु. अकरा हजार असून सु. सहा हजार श्लोकांचे आणखी एक छोटे लिंगपुराण होते, असे दिसते. यात ब्रह्मांडरुपी लिंगाची उत्पती, लिंगपूजा, शैवव्रते,शिवाचे २८ अवतार, काशीचे वर्णन ,तंत्रविद्या इ.विषय प्रामुख्याने आले असून हा लिंगायतांचा एक प्रमुख धर्मग्रंथ मानला जातो.

१४. अग्निपुराण : अग्नीने वसिष्ठांना सांगितल्यामुळे अग्नीचे नाव प्राप्त झालेले हे विश्वकोशात्मक पुराण इ.स.च्या सातव्या ते नवव्या शतकांच्या दरम्यान तयार झाले असावे, असे म्हणतात. यातील अनेक तांत्रिक अनुष्ठाने बंगालात आढळत असल्यामुळे ते तेथेच तयार झाले असावे, असे एक मत आहे. ३८३ अध्यायांच्या या पुराणात पंचलक्षणे आढळत असली, तरी परा व अपरा विद्यांचे वर्णनच महत्त्वाचे आहे. रामायण व महाभारताचे सार, बुद्धावतारासह इतर अवतार इ.विषयांबरोबरच छंद, व्याकरण, अलंकार, योग, ज्योतिष मंदिरे, मूर्ती, धर्म इत्यादींची शास्त्रे यात वर्णिलेली आहेत. यात गीतासार व यमगीता आलेली असून आयुर्वेद, वृक्ष आणि पशूंचे वैद्यक, रत्नपरीक्षा, धनुर्विद्या, मोहिनी व इतर काही इ. विषयांचे विवेचन आलेले आहेत.

१५. वराहपुराण : वराहावतारी विष्णूने हे पुराण पृथ्वीला सांगितले अशी समजूत असून, ते नवव्या-दहाव्या शतकांत तयार झाले असावे आणि त्याचा काही भाग अकराव्या व काही भाग पंधराव्या शतकातील असावा, असे मत आढळते. याचा पहिला भाग उत्तर भारतात व शेवटचा नेपाळात लिहिला गेला असावा, असा तर्क आढळतो. याचे गौडीय व दक्षिणात्य असे दोन पाठभेद आढळतात. याचे २१८ अध्याय असून त्यांपैकी काही गद्यात्मक आहेत, तर काहींमध्ये गद्य व पद्य यांचे मिश्रण आहे. यात २४ हजार श्लोक असल्याचा उल्लेख आढळत असला, तरी प्रत्यक्षात मात्र सु. १० हजार श्लोकच आढळतात. व्दादशीच्या व्रतासारखी अनेक वैष्णव व्रते यात असून रामानुज संप्रदायाने यातून अनेक वैष्णव अनेक विषय स्वीकारले आहेत. यात मथुरामाहात्म्य, नचिकेत्याने उपाख्यान इ. विषय प्रामुख्याने आले आहेत.

१६. ब्रह्मांडपुराण : ब्रह्मांडाची उत्पती आणि विस्तार यांचे वर्णन हा याचा मुख्य विषय असल्यामुळे याला ब्रह्मांड हे नाव मिळाले आहे. हे वायूने व्यासांना सांगितले असल्यामुळे याला वायवीय ब्रह्मांडपुराण असेही म्हणतात. वायु व ब्रह्मांड ही पुराणे एकच असून वायुपुराणात थोडा फरक करून ब्रह्मांडपुराण बनविलेले आहे. त्यातील परशुरामचरित्राचा भाग हा वायुपुराणापेक्षा अधिक आहे. इ.स.च्या चौथ्या ,पाचव्या ला सहाव्या शतकात हे तयार झाले असावे, अशी मते आहेत. गोदावरीच्या उगमाचा प्रदेश वा सह्याद्री हे याचे निर्मितिस्थान असावे, असे दिसते. याचे प्रक्रिया, अनुषंग, उपोदघात व उपसंहार असे चार पाद असून श्लोक सु. १२ हजार आहेत. यात परशुराम व कार्तवीर्य यांचा संघर्ष. ललितादेवीचे आख्यान, क्षत्रियराजवंशाचे वर्णन इ. विषय प्रमुख आहेत. अध्यात्मरामायण हा ग्रंथ आणि ललितासहस्त्रनाम, सरस्वतीस्तोत्र, गणेशकवच इ. भाग या पुराणातून घेतलेले आहेत. जावा-सुमात्रा बेटांतील भाषेत त्याचे भाषांतर झाले असून ते अजूनही तेथे प्रचारात आहे.

१७. ब्रह्मवैवर्तपुराण : कृष्णाने ब्रह्याचे विवरण केल्याचे वर्णन यात असल्यामुळे याला ब्रह्मवैवर्त हे नाव मिळाले आहे. याला दक्षिणेत ब्रह्मकैवर्तपुराण असे म्हणतात.आदिब्रह्मवैवर्त या नावाचे एक प्राचीन पुराणही आढळते. आठवे, नववे वा दहावे शतक हा त्याचा काळ मानलेला असून काहींच्या मते ते पंधराव्या शतकानंतरचे आहे. बहुधा बंगालमध्ये लिहिल्या गेलेल्या या पुराणाविषयी बंगाली वैष्णवांना फार आदर आहे. याचे २७६ अध्याय असून श्लोक सु. १८ हजार( एका मतानुसार सु.१० हजार) . ब्रह्म, प्रकृती, गणेश व कृष्णजन्म अशा चार खंडांत विभागलेल्या या पुराणाचा कृष्णजन्म खंड १३३ अध्यायांचा आहे. यात गणेश हा कृष्णाचा अवतार मानलेला असून उत्तान रासक्रिडा, अनेक माहात्म्ये इ. गोष्टी आढळतात.

१८. भविष्यपुराण : वस्तुतः पुराण हे प्राचीन असल्यामुळे भविष्यपुराण या नावात आत्मविसंगती आहे. परंतु भविष्यकालीन घटनांची व व्यक्तिंची वर्णने करण्याची भूमिका घेतल्यामुळे याला भविष्यपुराण हे नाव मिळाले आहे. भविष्योत्तर पुराण या नावाचे एक स्वतंत्र पुस्तक असून काहींच्या मते ते भविष्यपुराणाचे उत्तर पर्व आहे. काहीच्या मते ते स्वतंत्र पुराण आहे. याचा काळ सु. सहावे-सातवे वा दहावे शतक हा मानला जात असला, तरी आपस्तंबधर्मसूत्रात त्याच्या नावनिशी उल्लेख असल्यामुळे त्याचा निदान काही भाग तरी अत्यंत प्राचीन असला पाहिजे. नारदपुराणानुसार याची ब्राह्म, विष्णू, शिव, सूर्य व प्रतिसर्ग अशी पाच पर्वे असून श्लोकसंख्या सु. १४ हजार आहे. याच्या वेगवेगळ्या चार प्रती मिळालेल्या आहेत. इतर कोणत्याही पुराणापेक्षा यात जास्त भर पडली असल्यामुळे याचे मूळचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. यात इंग्रजी अमदानीतील घटनांचीही वर्णने आली आहेत. उदा, व्हिक्टोरिया राणीला यात विकटावती म्हटले आहे, तर रविवारला संडे म्हणतात, असे सांगितले आहे. यात सूर्योपासना विशेषत्वाने आली असून कित्येक घटनांची व राजवंशांची वर्णने ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची आहेत.

॥श्री गुरुदेव दत्त॥


this information is taken from TEMBE SWAMI GROUP written by 
हेमाली कोठावळे

Tuesday, January 24, 2017

श्रीं क्षेत्र गाणगापुर

निर्गुण मठ (श्री दत्त मंदिर) :- श्रींची कर्मभूमी. श्रींच्या अनेक अतर्क्य लीलांनी पुनित झालेले हे तीर्थक्षेत्र. या मठात श्रींच्या निर्गुण पादुका आहेत.




गाणगापूर दिव्य निर्गुण पादुका यांचे काय महात्म्य आहे ?

दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदी मधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त जाहल्या नंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी "श्री नृसिंहसरस्वती" महाराजांनी दर्शन दिले.पादुका विशेष -वाडीच्या पादुकांना ‘मनोहर पादुका’ म्हणतात, तर गाणगापूर तेथील पादुकांना ‘निर्गुण पादुका’ अशी संज्ञा आहे.
येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठलाही पाणी स्पर्श नाही.या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पूजोपचरांसाठी ताम्हणांत ‘उदक’ सोडतात.

श्रींनी आपले अवतार कार्य संपवून गाणगापूरहून निजानंद गमनासाठी आपल्या चार प्रिय शिष्यांसह (श्रीसिद्धमुनी, श्री सायंदेव, श्री नंदीनाम व श्री नरहरीकवि) श्रीशैलकडे प्रस्थान केले.

“शिशिर ऋतु माघमासीं | असितपक्ष प्रतिपदेसी | शुक्रवारीं पुण्यदिवसीं | श्रीगुरु बैसले निजानंदी ||३७|| अ.५१”

“श्रीगुरु म्हणती शिष्यांसी | जातों आम्ही निज मठासी | पावतां खूण तुम्हांसी | प्रसादपुष्पें पाठवितों ||३८|| अ.५१”


श्री कल्लेश्वर मंदिर :-  गाणगापूर येथील कल्लेश्वर स्थान महात्म्य काय आहे?

श्री क्षेत्र गाणगापुरच्या पूर्वेला अष्टतीर्थांपैकी मन्मथ तीर्थाच्या जवळ असलेले हे श्री कल्लेश्वर मंदिर. या मंदिर परिसरात श्री पंचमुखी गणेश, श्रीदुर्गापार्वती, नवग्रह आणि शमीवृक्षातून प्रकट झालेले शनैश्वर इ. देवतांची मंदिरे आहेत.

कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात. कल्लेश्र्वरहे मुक्तीस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहेगाणगापूर येथील संगम स्थानाचा काय महिमा आहे ?

श्रीगुरुचरित्रातल्या ४९ व्या अध्यायात या श्री कल्लेश्वराचे महत्त्व सांगितलेले आहे.

“ग्रामपूर्वभागेसी | कल्लेश्वर देव परियेसीं | जैसे गोकर्णमहाबळेश्वरासी | समान क्षेत्र परियेसा ||९७||”

संगमेश्वर :- 
भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्ती पीठावर झाला आहे. सदरील संगम निर्गुण मठापासून २ ते ३ किलोमीटर आहे. या संगम स्थानी "भगवान श्री नृसिंह सरस्वती" नित्य स्नान करत असत. या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे.

या संगमात स्नान केल्याने भाविकाचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित. निर्गुणमठाच्या पादुकादर्शनअगोदर भाविक संगमावर स्नान करतात.
पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते.गाणगापूर दर्शन -गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार "श्री नृसिंह सरस्वती" महाराज यांनी २२ ते २३ वर्ष वास्तव्य केले. या संपूर्ण क्षेत्रामध्ये, संगम स्नान (भीमा +अमरजा नदी संगम), निर्गुण पादुका दर्शन, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका महात्म्य आहे, या दिव्य भूमीचे दर्शन भाविकांना व्हावे.

श्रीगरुचरित्रात ४९व्या अध्यायात या पवित्र स्थानांतील तीर्थांचे महात्म्य सांगितले आहे. या ठिकाणी अमरजा व भीमा नदीचा संगम आहे. या संगमाच्या पश्चिमेला श्री संगमेश्वर (श्रीशंकराचे) मंदिर आहे. श्री येथे नित्य अनुष्ठानासाठी येत असत.

कल्पवृक्षातें पूजोनि | मग जावे शंकरभुवनीं | संगमेश्वर असे त्रिनयनी | पूजा करावी मनोभावें ||३९||
 जैसा पर्वती मल्लिकार्जुन | तैसा संगमीं रुद्र आपण || भक्तिपूर्वक प्रदक्षिणा | करावी तुम्ही अवधारा ||४०||


गाणगापूर येथील औदुंबर वृक्षाचा काय महिमा 

संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षा मध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्या आहे. हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधी मुक्त झाले आहे. आपणास कधीहि गाणगापूर येथे जाण्यास योग आल्यास संगम स्नान करून औदुंबरास -११, २१, १०८ प्रदक्षिणा नक्की घाल्याव्यात. आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचे दिव्य वरदान आहे. या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक "गुरुचरित्र" या जागृत ग्रंथाचे पारायण करतात.




अष्टतीर्थ स्थाने

भूमीवर असंख्य पवित्र तीर्थस्थाने असतानाही श्रींनी गाणगापूर क्षेत्रीच का वास्तव्य केले याबाबत श्रीगरुचरित्रात ४९व्या अध्यायात सविस्तर उल्लेख असून येथील अष्टतीर्थांचा महिमा सांगितलेला आहे. ती अष्टतीर्थें पुढीलप्रमाणे आहेत.

१. षट्कुळ तीर्थ

भीमा व अमरजा संगमाच्या पश्चिम तटावरील औदुंबरवृक्षासमोर असलेले हे षट्कुळ तीर्थ. हे प्रयाग तीर्थासमान आहे.

औदुंबर वृक्षाचा काय महिमा आहे ...?

संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षामध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्याआहे. हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधी मुक्त झाले आहे. आपणास कधीहि गाणगापूर येथे जाण्यास योग आल्याससंगम स्नान करून औदुंबरास -११,२१,१०८ प्रदक्षिणा नक्की घाल्याव्यात. आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचा दिव्य वरदान आहे.

या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक "गुरुचरित्र" या जागृत ग्रंथाचे पारायण करतात.

२. श्री नरसिंह तीर्थ

भीमा व अमरजा संगमाच्या पश्चिम तटावरील कल्पवृक्षासमोर असलेले हे श्री नरसिंह तीर्थ.

३. भागीरथी तीर्थ

काशीप्रमाणेच येथे काही अंतरावर असलेल्या मणिकर्णिका कुंडातून निघालेले पाणी भीमा नदीला जाऊन मिळते ते ठिकाण म्हणजे भागीरथी तीर्थ. हे तीर्थ काशीसमान आहे.

४. पापविनाशी तीर्थ

“ऐसे प्रख्यात तीर्थ देखा | नाम पापविनाशी ऐका | जे करिती स्नान भक्तिपूर्वका | सप्तजन्मींचीं पापें जाती ||८४||

५. कोटीतीर्थ

“सोम-सूर्यग्रहाणासी | अथवा संक्रतिपर्वणीसी | अमापौर्णिमा प्रतिपदेसी | स्नान तेथें करावे ||८८||
सवत्सेसी धेनु देखा | सालंकृत करोनि ऐका | दान द्यावें व्दिजा निका | एकेक दान कोटिसरसे ||८९||

६. रुद्रपादतीर्थ

हे तीर्थस्थान गया तीर्थासारखे आहे. रुद्रपादाची पूजा केल्याने कोटी जन्मांची पापे जातात.

७. चक्रतीर्थ

येथे स्नान केल्याने पाप्याला ज्ञान होते व व्दारका तीर्थासारखे पुण्य मिळते येथे अस्थि चक्रांकित होतात. या तीर्थाजवळ केशवदेवाचे मंदिर आहे.

८. मन्मथ तीर्थ

“ग्रामपूर्वभागेसी | कल्लेश्वर देव परियेसीं | जैसे गोकर्णमहाबळेश्वरासी | समान क्षेत्र परियेसा ||९७|| मन्मथ तीर्थीं स्नान करावे | क्ललेश्वरातें पूजावें | प्रजावृध्दी होय बरवें | अष्टैश्वर्यें पाविजे ||९८||”

विश्रांती कट्टा :-

श्रीगुरुचरित्राच्या ४८ व्या अध्यायात एका शुद्र शेतकऱ्याच्या भक्तीने संतोष पावून श्रींनी त्याच्यावर कृपा केल्याबाबतची सविस्तर घटना सांगितली आहे.

नागेशी :-

श्रीगुरुचरित्राच्या १३ व १४ व्या अध्यायात श्रींच्या व ज्या सायंदेव नावाच्या ब्राह्मणाच्या भेटीचा व श्रींनी यवनापासून त्याला दिलेल्या अभयाबाबतचा उल्लेख आलेला आहे तो ब्राह्मण श्रींनी दिलेल्या आश्वासनानुसार २५ वर्षांनंतर गाणगापुरात श्रींच्या दर्शनार्थ आला ते श्रींची सेवा करण्याच्या निर्धाराने. त्या भक्ताचे अंत:करण पाहण्यासाठी श्रींनी श्री सायंदेवांची परीक्षा घेतली. त्याबाबतची घटना ४१ व्या अध्यायात सविस्तर आलेली आहे. ती घटना ज्या स्थानी घडली ते स्थान म्हणजे नागेशी.

सती कट्टा :-

माहूरच्या एका धनिकाच्या दत्त नावाच्या मुलाला त्याच्या विवाहानंतर चार वर्षांनी क्षय व्याधी झाली. ती बरी व्हावी म्हणून अनेक उपाय केले पण व्याधी विकोपाला गेली. सरतेशेवटी त्याची पत्नी त्याला घेऊन श्रींच्या दर्शनार्थ गाणगापूरला येताच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. (यासंबंधाने श्रीगुरुचरित्रात ३०, ३१ व ३२ सविस्तर वर्णन आलेले आहे.) धर्माचरणाप्रमाणे तिने सती जाण्याची ज्या स्थानी सर्व तयारी केली ती ही जागा.

कुमसी :-

श्रीगुरुचरित्राच्या २३ व २४ व्या अध्यायात कुमसी ग्रामाच्या तीन वेद जाणणाऱ्या त्रिविक्रम भारती तपस्वीबाबतची घटना वर्णन केलेली आहे. श्रींनी कुमसी गांवी त्रिविक्रम भारतींना ज्या स्थानी विश्वरूप दर्शन दिले त्या स्थानाची छायाचित्रे सोबत दिलेली आहेत. हे स्थान गाणगापूरपासून ३७ कि.मी. अंतरावर भीमा नदी तटावर आहे.

हिप्परगी (मंदेवाल) :- श्गाणगापूरपासून ३९ कि.मी. अंतरावर विजापूर जिल्ह्यातील हे एक छोटेसे गांव आहे. श्रीगुरुचरित्रातील ४६ व्या अध्यायात नरहरी कविबाबत या स्थानी घडलेल्या घटनेचा उल्लेख आहे. पुढे नरहरी कवि श्रींचे भक्त झाले आणि गाणगापुरात श्रींवर स्तुतीपर अनेक कवने करून त्यांच्या अखंड सेवेत राहिले.

तंतुकेश्वर मंदिर :-

श्रीगुरुचरित्राच्या ४८ व्या अध्यायात तंतुकाबाबतची (विणकर) घटना आली आहे. श्रींनी एका भक्त तंतुकाला महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीशैल्ययात्रा घडविल्याबाबतची ही घटना आहे. ज्या मंदिरात ही घटना घडली त्या मंदिराला पुढे तंतुकश्वराचे मंदिर असे नांव पडले.

गाणगापूरची गांव वेस :-

श्री नरसोबाच्या वाडीतील आपले १२ वर्षांचे वास्तव्य संपवून गाणगापूरला आले. प्रथमत: ते संगमावर राहिले. पण वांझ म्हशीला दुभती केल्याच्या चमत्कारामुळे ते प्रसिध्दीस आले. त्यामुळे गाणगापूरचा यवन राजा त्यांचा भक्त झाला. त्यानेच श्रींना आग्रह करून त्यांना वाजत गाजत ज्या वेशीतून गाणगापूर नगरांत आणले ती ही वेस. याबाबतचा उल्लेख श्रीगुरुचरित्राच्या २३ व्या अध्यायात आलेला आहे.

श्रींचे पुष्परूपाने पुनरागमन :-

या पंचक्रोशीत श्रीभक्तांमध्ये माघ कृष्ण चतुर्थीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

माघ कृष्ण प्रतिपदा (गुरुप्रतिपदा), शुक्रवार या पुण्य दिवशी श्रींनी गाणगापूरहून निजानंद गमनासाठी आपल्या चार प्रिय शिष्यांसह श्रीशैलकडे प्रस्थान करण्यापूर्वी श्रींनी दु:खित भक्तांना, लौकिकार्थाने येथून जात असलो तरी आपला नित्य वास गाणगापूरीच असेल आणि भक्तांचा जसा भाव असेल त्याप्रमाणे मी त्याना माझे दर्शन घडेल, असे आश्वास दिले होते.
पाताळगंगेत पुष्पासनावर बसल्यावर श्रींनी आपल्या सोबत आलेल्या शिष्यांना आश्वासित केले की आपण निजानंदी पोहचल्याची खूण म्हणून चार शेवंतीची पुष्पें पाठवितो ती प्रसाद म्हणून स्वीकारावी त्यांची अखंड पूजा करावी. श्रींच्या आश्वासनाप्रमाणे शेवंतीची चार फुलं गंगेतून वाहात आली. तो दिवस म्हणजे माघ कृष्ण चतुर्थीचा होता.

आजच्या दिवशी श्रींच्या पुष्परूपी पुनरागमनाप्रित्यर्थ येथे दु.१२.३० वाजता श्रींचा पालखी सोहळा असतो. पंचक्रोशीतील हजारो श्रीभक्त या रोमांचकारी पालखी सोहळ्याला श्रींच्या दर्शनासाठी, त्यांच्या स्वागतासाठी, मोठ्या भक्तिभावाने उपस्थित असतात.

ही पालखी अष्टतीर्थांपैकी एक रुद्रपाद तीर्थापर्यंत वाजत-गाजत येते. या तीर्थांत श्रींच्या पादुकांना तीर्थस्नान असते. श्रीभक्तही या ठिकाणी आजच्या दिवशी या पवित्र तीर्थांत स्नान करून पुण्य मिळवतात. सोहळ्याला हजारो भक्तांची उपस्थिती असली तरी अतिशय शांतपणे हा सोहळा संपन्न होतो.

या भारलेल्या वातावरणाचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे.


गाणगापूर येथील "भस्माचा डोंगर" या स्थळा बद्दलचा स्थान महिमा काय आहे?

भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्व आहे. सदरील भूमीमध्ये अनेक ऋशी मुनींनी केलेली तप साधना यामुळे या तपोभूमितील “विभूती” अनेक भाविक घरी घेऊन जातात, त्याच प्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासठी येथील पाषाण द्वारे रचना तयार करायची सुधा एकपद्धत आहे.



॥श्री गुरुदेव दत्त॥






Monday, January 16, 2017

श्री दत्तवज्र कवचम्



॥ श्री दत्त वज्र पन्जर कवचम् ॥

विनियोगः ॐ अस्य श्रीदत्तात्रेय वज्रपन्जर कवच स्तोत्र कवच मंत्रस्य श्री किरातरूपी महारुद्र ऋषिः, अनुष्टुप छंदः, श्री दत्तात्रेयो देवता, द्रां बीजं, आं शक्तिः, क्रौं कीलकं, ॐ आत्मने नमः। ॐ द्रीं मनसे नमः। ॐ आं द्रीं श्रीं सौः ॐ क्लां क्लीं क्लूं क्लैं क्लौं क्लः। श्री दत्तात्रेय प्रसाद सिद्ध्यर्थे समस्त श्रीगुरुमण्डल प्रीति द्वारा मम सम्पूर्ण रक्षणार्थे, स्वकृतेन आत्म मंत्रयंत्रतंत्र रक्षणार्थे च पारायणे विनियोगः।

ऋष्यादिन्यासः
श्री किरातरूपी महारुद्र ऋषये नमः शिरसि।
अनुष्टुप छंदसे नमः मुखे।
श्री दत्तत्रेयो देवतायै नमः ह्रदि।
द्रां बीजाय नमः गुह्ये।
आं शक्तये नमः नाभौ।
क्रौं कीलकाय नमः पादयोः।
श्री दत्तात्रेय प्रसाद सिद्ध्यर्थे समस्त श्रीगुरुमण्डल प्रीति द्वारा मम सम्पूर्ण रक्षणार्थे, स्वकृतेन आत्म मंत्रयंत्रतंत्र रक्षणार्थे च पारायणे विनियोगाय नमः अंजलौ।

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

करन्यासः
ॐ द्रां अंगुष्ठाभ्यां नमः।
ॐ द्रीं तर्जनीभ्यां नमः।
ॐ द्रूं मध्यमाभ्यां नमः।
ॐ द्रैं अनामिकाभ्यां नमः।
ॐ द्रौं कनिष्ठिकाभ्यां नमः।
ॐ द्रः करतलकरपृष्ठाभ्यां नमः।
ॐ भूर्भुवः स्वरोम इति दिग्बन्धः।

ह्र्दयादिन्यासः
ॐ द्रां ह्रदयाय नमः।
ॐ द्रीं शिरसे स्वाहा।
ॐ द्रूं शिखायै वषट् ।
ॐ द्रैं कवचाय हुं।
ॐ द्रौं नेत्रत्रयाय वौषट।
ॐ द्रः अस्त्राय फट्।

ॐ भूर्भुवः स्वरोम इति दिग्बन्धः।

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

ध्यानम्ः


जगदंकुरकन्दाय सच्चिदानन्द मूर्तये। दत्तात्रेयाय योगीन्द्रचन्द्राय परमात्मने॥
कदा योगी कदा भोगी कदा नग्नः पिशाचवत्। दत्तात्रेयो हरिः साक्षाद् भुक्तिमुक्ति प्रदायकः॥
वाराणसीपुर स्नायी कोल्हापुर जपादरः। माहुरीपुर भिक्षाशी सह्यशायी दिगम्बरः॥
इन्द्रनील समाकारः चन्द्रकान्तसम द्युतिः। वैडूर्यसदृश स्फूर्तिः चलत्किंचित जटाधरः॥
स्निग्धधावल्य युक्ताक्षो अत्यन्त नीलकनीनिकः। भ्रूवक्षः श्मश्रु नीलांकः शशांक सदृशाननः॥
हासनिर्जित नीहारः कण्ठनिर्जित कम्बुकः। मांसलांसो दीर्घबाहुः पाणिनिर्जित पल्लवः॥
विशाल पीनवक्षाश्च ताम्रपाणिर्दलोदरः। पृथुल श्रोणि ललितो विशाल जघनस्थलः॥
रम्भास्तम्भोपमानः ऊरूर्जानु पूर्वैकजंघकः। गूढ़गुल्फः कूर्मपृष्ठो लसत् पादोपरिस्थलः॥
रक्तारविन्द सदृश रमणीय पदाधरः। चर्माम्बरधरो योगी स्मर्तृगामी क्षणे क्षणे॥
ज्ञानोपदेश निरतो विपद हरणदीक्षितः। सिद्धासन समासीन ऋजुकायो हसन्मुखः॥
वामहस्तेन वरदो दक्षिणेन् अभयं करः। बालोन्मत्त पिशाचीभिः क्वचिद् युक्तः परीक्षितः॥
त्यागी भोगी महायोगी नित्यानन्दो निरंजनः। सर्वरूपी सर्वदाता सर्वगः सर्वकामदः॥
भस्मोद्धूलित सर्वांगो महापातकनाशनः। भुक्तिप्रदो मुक्तिदाता जीवन्मुक्तो न संशयः॥
एवं ध्यात्वा अनन्यचित्तो मद् वज्रकवचं पठेत्। मामेव पश्यन् सर्वत्र स मया सह संचरेत्॥
दिगम्बरं भस्म सुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदायुधम्।
पद्मासनं योगिमुनीन्द्र वन्दितं दत्तेति नाम स्मरणेन् नित्यम्॥

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मूल कवचम्ः

ॐ दत्तात्रेयः शिरः पातु सहस्राब्जेषु संस्थितः । भालं पातु अनसूयेयः चन्द्रमण्डल मध्यगः ॥१॥

कूर्चं मनोमयः पातु हं क्षं व्दिदल पद्मभूः। ज्योतिरूपो अक्षिणी पातु पातु शब्दात्मकः श्रुतिः ॥२॥

नासिकां पातु गन्धात्मा मुखं पातु रसात्मकः। जिह्वां वेदात्मकः पातु दन्तोष्ठौ पातु धार्मिकः ॥३॥

कपोलावत्रिभूः पातु पातु अशेषं ममात्मवित्। स्वरात्मा षोडशाराब्ज स्थितः स्वात्मा अवताद् गलम् ॥४॥

स्कन्धौ चन्द्रानुजः पातु भुजौ पातु कृतादिभूः। जत्रुणी शत्रुजित पातु पातु वक्षः स्थलं हरिः ॥५॥

कादिठान्त व्दादशार पद्मगो मरुदात्मकः। योगीश्वरेश्वरः पातु ह्रदयं ह्रदय स्थितः ॥६॥

पार्श्वे हरिः पार्श्ववर्ती पातु पार्श्वस्थितः समृतः। हठयोगादि योगज्ञः कुक्षी पातु कृपानिधिः ॥७॥

डकारादि फकारान्त दशार सरसीरुहे। नाभिस्थले वर्तमानो नाभिं वह्न्यात्मकोऽवतु ॥८॥

वह्नि तत्वमयो योगी रक्षतान्मणिपूरकम्। कटिं कटिस्थ ब्रह्माण्ड वासुदेवात्मकोऽवतु ॥९॥

बकारादि लकारान्त षट्पत्राम्बुज बोधकः। जल तत्वमयो योगी स्वाधिष्ठानं ममावतु ॥१०॥

सिद्धासन समासीन ऊरू सिद्धेश्वरोऽवतु। वादिसान्त चतुष्पत्र सरोरुह निबोधकः ॥११॥

मूलाधारं महीरूपो रक्षताद् वीर्यनिग्रही। पृष्ठं च सर्वतः पातु जानुन्यस्तकराम्बुजः ॥१२॥

जंघे पातु अवधूतेन्द्रः पात्वंघ्री तीर्थपावनः। सर्वांगं पातु सर्वात्मा रोमाण्यवतु केशवः ॥१३॥

चर्म चर्माम्बरः पातु रक्तं भक्तिप्रियोऽवतु। मांसं मांसकरः पातु मज्जां मज्जात्मकोऽवतु ॥१४॥

अस्थीनि स्थिरधीः पायान्मेधां वेधाः प्रपालयेत्। शुक्रं सुखकरः पातु चित्तं पातु दृढ़ाकृतिः ॥१५॥

मनोबुद्धिं अहंकारं ह्रषीकेशात्मकोऽवतु। कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यजः ॥१६॥

बन्धून् बन्धूत्तमः पायात् शत्रुभ्यः पातु शत्रुजित्। गृहाराम धनक्षेत्र पुत्रादीन् शंकरोऽवतु ॥१७॥

भार्यां प्रकृतिवित् पातु पश्वादीन् पातु शांर्गभृत्। प्राणान्पातु प्रधानज्ञो भक्ष्यादीन् पातु भास्करः ॥१८॥

सुखं चन्द्रात्मकः पातु दुःखात् पातु पुरान्तकः। पशून् पशुपतिः पातु भूतिं भूतेश्वरो मम् ॥१९॥

प्राच्यां विषहरः पातु पातु आग्नेयां मखात्मकः। याम्यां धर्मात्मकः पातु नैर्ऋत्यां सर्ववैरिह्रत् ॥२०॥

वराहः पातु वारुण्यां वायव्यां प्राणदोऽवतु। कौबेर्यां धनदः पातु पातु ऐशान्यां महागुरुः ॥२१॥

ऊर्ध्वं पातु महासिद्धः पातु अधस्ताद् जटाधरः। रक्षाहीनं तु यत्स्थानं रक्षतु आदिमुनीश्वरः ॥२२॥


फलश्रुतिः


एतन्मे वज्रकवचं यः पठेच्छृणुयादपि । वज्रकायः चिरंजीवी दत्तात्रेयो अहमब्रुवम् ॥२३॥

त्यागी भोगी महायोगी सुखदुःख विवर्जितः । सर्वत्र सिद्धिसंकल्पो जीवन्मुक्तोऽथ वर्तते ॥२४॥

इत्युक्त्वान्तर्दधे योगी दत्तात्रेयो दिगम्बरः । दलादनोऽपि तज्जपत्वा जीवन्मुक्तः स वर्तते ॥२५॥

भिल्लो दूरश्रवा नाम तदानीं श्रुतवानिदम् । सकृच्छ्र्वणमात्रेण वज्रांगो अभवदप्यसौ ॥२६॥

इत्येतद वज्रकवचं दत्तात्रेयस्य योगिनः । श्रुत्वाशेषं शम्भुमुखात् पुनरप्याह पार्वती ॥२७॥

एतत् कवचं माहात्म्यं वद विस्तरतो मम् । कुत्र केन कदा जाप्यं किं यज्जाप्यं कथं कथम् ॥२८॥

उवाच शम्भुस्तत्सर्वं पार्वत्या विनयोदितम् । श्रृणु पार्वति वक्ष्यामि समाहितमनाविलम् ॥२९॥

धर्मार्थकाममोक्षाणां इदमेव परायणम् । हस्त्यश्वरथपादाति सर्वैश्वर्य प्रदायकम् ॥३०॥

पुत्रमित्रकलत्रादि सर्वसन्तोष साधनम् । वेदशास्त्रादि विद्यानां निधानं परमं हि तत् ॥३१॥

संगीतशास्त्रसाहित्य सत्कवित्व विधायकम् । बुद्धि विद्या स्मृतिप्रज्ञां अतिप्रौढिप्रदायकम् ॥३२॥

सर्वसन्तोष करणं सर्व दुःख निवारणम् । शत्रु संहारकं शीघ्रं यशः कीर्तिविवर्धनम् ॥३३॥

अष्टसंख्या महारोगाः सन्निपातः त्रयोदशः । षण्णवत्यक्षिरोगाश्च विंशतिर्मेहरोगकाः ॥३४॥

अष्टादश तु कुष्ठानि गुल्मानि अष्टविधान्यपि । अशीतिर्वातरोगाश्च चत्वारिंश्त्तु पैत्तिकाः ॥३५॥

विंशति श्लेष्मरोगाश्च क्षयचातुर्थिकादयः । मन्त्रयन्त्रकुयोगाद्याः कल्पतन्त्रादि निर्मिताः ॥३६॥

ब्रह्मराक्षस वेतालकूष्माण्डादि ग्रहोद्भवाः । संगजा देशकालस्थान तापत्रयसमुत्थिताः ॥३७॥

नवग्रह समुद्भूता महापातक सम्भवाः । सर्वे रोगाः प्रणश्यन्ति सहस्रावर्तनाद् ध्रुवम् ॥३८॥

अयुतावृत्ति मात्रेण वन्ध्या पुत्रवति भवेत् । अयुत व्दितयावृत्या हि अपमृत्युर्जयो भवेत् ॥३९॥

अयुत त्रितयाच्चैव खेचरत्वं प्रजायते । सहस्रादयुतादर्वाक् सर्वकार्याणि साधयेत् ॥४०॥

लक्षावृत्त्या कार्यसिद्धिः भवत्येव न संशयः । विषवृक्षस्य मूलेषु तिष्ठन् वै दक्षिणामुखः ॥४१॥

कुरुते मासमात्रेण वैरिणं विकलेन्द्रियम् । औदुम्बर तरोर्मूले वृद्धिकामेन् जाप्यते ॥४२॥

श्रीवृक्षमूले श्रीकामी तिंतिणी शांतिकर्मणि । ओजस्कामो अश्वत्थमूले स्त्रीकामैः सहकारके ॥४३॥

ज्ञानार्थी तुलसीमूले गर्भगेहे सुतार्थिभिः । धनार्थिभिस्तु सुक्षेत्रे पशुकामैस्तु गोष्ठके ॥४४॥

देवालये सर्वकामैस्तत्काले सर्वदर्शितम । नाभिमात्रजले स्थित्वा भानुम् आलोक्य यो जपेत् ॥४५॥

युद्धे वा शास्त्रवादे वा सहस्त्रेण जयो भवेत् । कंठमात्रे जले स्थित्वा यो रात्रौ कवचं पठेत् ॥४६॥

ज्वरापस्मार कुष्ठादि तापज्वर निवारणम् । यत्र यत्स्यात्स्थिरं यद्यत्प्रसन्नं तन्निवर्तते॥४७॥

तेन् तत्र हि जप्तव्यं ततः सिद्धिर्भवेद्‍ ध्रुवं । इत्युक्त्वान् च शिवो गौर्ये रहस्यं परमं शुभम् ॥४८॥

यः पठेत् वज्रकवचं दत्तात्रेयो समो भवेत् । एवं शिवेन् कथितं हिमवत्सुतायै प्रोक्तम् ॥४९॥

दलादमुनये अत्रिसुतेन पूर्वम् यः कोअपि वज्रकवचं। पठतीह लोके दत्तोपमश्चरति योगिवरश्चिरायुः॥५०॥


॥ हरिः ॐ तत्सत् श्री सदगुरुः महावधूत दत्त ब्रह्मार्पणमस्तु ॥

॥श्री गुरुदेव दत्त॥

This information is shared by 
हेमाली कोठावळे on TEMBE SWAMI MAHARAJ group



Saturday, January 14, 2017

श्रीनारदमुनींनी रचलेले "दिव्य श्रीदत्तात्रेयस्तोत्र"

भगवान श्रीदत्तात्रेयांच्या कृपेने देवऋषी श्रीनारदमुनींनी रचलेले "दिव्य श्रीदत्तात्रेयस्तोत्र"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अर्थासहित पूढे देत आहे. हे लिहून घ्यावेत आणि दररोजच्या नित्य सेवेत घेऊन अनुभव घ्यावा.

☆- हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्रीदत्तात्रेयांचे साक्षात् दर्शन करविणारे आहे. असे हे स्तोत्र श्रीनारदपुराणातील असुन हे स्वतः श्रीनारदमुनींनीच रचले आहे.

☆- हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे, तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रम्हानुभव देणारे असून याच्या पठणाने सर्व पापांचे शमन होते. तथा या स्तोत्राच्या नियमित पठणाने श्रीगुरुदत्तात्रेयांचा कृपाशिर्वाद लाभेल.

?॥ ॥ श्रीदत्तत्रेय स्तोत्रम् ॥
========================
ध्यानम् :-
------------
जटाधरं पाण्डुरंगं शूलहस्तं कृपानिधिम् |
सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ||

*(अर्थ :- जटाधारी, गौरवर्ण, हातात त्रिशूल धारण करणाऱ्या. दयानिधी, सर्वरोग नाहीसे करणार्‍या श्रीदत्तत्रेयदेवांना मी भजतो.)

विनियोग: :-
---------------
ॐ अस्य श्रीदत्तत्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारद ऋषि; अनुष्टुप् छन्दः
परमात्मा देवता, श्रीदत्तप्रीत्यर्थं जपे विनियोग: ||


जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहारहेतवे |
भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तु ते ||1||

*(अर्थ :- हे दत्तात्रेय, जगाची उत्पत्ती करणार्‍या, तसेच जगाचे अस्तित्व व नाश यांना कारण असणार्‍या पण संसारबंधनापासून मुक्त असणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)

जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च |
दिगंबर दयामुर्ते दत्तात्रेय नमोSस्तु ते ||2||

*(अर्थ :- हे दिगंबर, दत्तात्रेय, आपण दयेचे मुर्तिमंत रुप. वार्धक्य व पुनर्जन्म नाहीसे करणार्‍या आणि देह शुद्ध करणार्‍या तुम्हांला नमस्कार असो. )

कर्पूरकान्तिदेहाय ब्रम्मूर्तिधराय च |
वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||3||

*(अर्थ :- हे दत्तात्रेय, आपली देहकांति कापरासारखी. आपणच ब्रम्हदेवरुप धारण केलेत. वेद-शास्त्र पूर्ण जाणणार्‍या तुम्हांला नमस्कार असो.)

ह्रस्वदीर्घकृशस्थूल नामगोत्रविवर्जित |
पञ्चभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||4|
|
*(अर्थ :- स्वेच्छेने आखूड, लांब, कृश, स्थूल रुपे धारण करणारे पण नाव व गोत्र नसलेले हे दत्तात्रेय, पंचमहाभूते हेच एक दीप्तिमान शरीर असणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)

यज्ञभोक्त्रे च यज्ञाय यज्ञरुपधराय च |
यज्ञप्रियाय सिध्दाय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||5||

(अर्थ :- हे दत्तात्रेय, यज्ञाचा उपभोग घेणार्‍या, स्वतः यज्ञ असलेल्या, यज्ञरुप धारण करणाऱ्या, यज्ञ प्रिय असणाऱ्या सिद्ध अशा तुम्हांला नमस्कार असो.)

आदौ ब्रम्हा मध्ये विष्णुर्अन्ते देवः सदाशिवः |
मुर्तित्रयस्वरुपाय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||6||

(अर्थ :- हे दत्तात्रेय, उजवीकडून आधी ब्रम्हा, मध्ये विष्णू, शेवटी सदाशिव अशा त्रिमूर्तिरुप तुम्हांला नमस्कार असो.)

भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे |
जितेन्द्रिय जितज्ञाय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||7||

(अर्थ :- हे जितेन्द्रिय दत्तात्रेय, सर्व सुखभोगांची खाण व सुखभोगस्वरुप आपणच. योगाला योग्य रुप आपण धारण केलेत. संयमी लोकांनाच ज्यांचे ज्ञान होते, अशा तुम्हांला नमस्कार असो.)

दिगंबराय दिव्याय दिव्यरुपधराय च |
सदोदितपरब्रम्ह दत्तात्रेय नमोSस्तु ते ||8||

(अर्थ :- हे नित्य परब्रह्मरुप दत्तात्रेय, दिशा हेच आपले वस्त्र. स्वतः दिव्य असून दिव्य रुप धारण करणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)

जम्बूद्वीपे महाक्षेत्रे मातापुरनिवासिने |
जयमानः सतां देव दत्तात्रेय नमोSस्तु ते ||9||

(अर्थ :- नेहमी विजयी होणारे, संतांचें देव, हे दत्तात्रेय, जम्बूद्वीपातील महाक्षेत्र अशा मातापुरात माहुरगडावर आपण राहता. तुम्हांला नमस्कार असो.)

भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे |
नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोSस्तु ते ||10||

(अर्थ :- हे दत्तात्रेय, हातात सुवर्ण पात्र घेऊन गावागावांत घराघरांतून भिक्षा मागून नाना प्रकारच्या स्वादांनी युक्त भिक्षा घेणार्‍या तुम्हांला नमस्कार असो.)

ब्रम्हज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले |
प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||11||

(अर्थ :- हे दत्तात्रेय, ज्यांनी ब्रम्हज्ञान - मुद्रा धारण केली आहे, आकाश व पृथ्वी ही ज्यांची वस्त्रे आहेत. आणि ज्यांची जाणीव आत्मज्ञानपूर्ण आहे, अशा तुम्हांला नमस्कार असो.)

अवधूत सदानंद परब्रह्मस्वरुपिणे |
विदेहदेहरुपायदत्तात्रेय नमोSस्तु ते ||12||

*(अर्थ :- हे अवधूत, नित्य आनंदरूप दत्तात्रेय, देहात असूनही विदेही अशा परब्रह्मस्वरुप तुम्हांला नमस्कार असो.)

सत्यरुप सदाचार सत्यधर्मपरायण |
सत्याश्रय परोक्षाय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||13||

*(अर्थ :- हे दत्तात्रेय, सत्यरुपी, सदाचरणात व धर्मात तत्पर व सत्याचे आश्रय तुम्ही आहात. इंद्रियांना न कळणार्या तुम्हांला नमस्कार असो.)

शूलहस्त गदापाणे वनमालासुकन्धर |
यज्ञसूत्रधर ब्रम्हन्दत्तात्रेय नमोSस्तु ते ||14||

*(अर्थ :- हे दत्तात्रेय, आपण हातात त्रिशूळ व गदा धारण केली आहे. आपला गळा वनातील फुलांच्या माळांनी शोभत आहे. यज्ञोपवीत धारण करणार्‍या ब्राह्मणस्वरुप आपल्याला नमस्कार असो.)

क्षराक्षरस्वरुपाय परात्परतराय च |
दत्तमुक्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोSस्तु ते ||15||

*(अर्थ :- हे दत्तात्रेय, विनाशी विश्वरुप व अविनाशी परमात्मरुप आपनच धारण करता. मुक्तिपर स्तोत्र रचण्याची स्फुर्ती आपणच दिली. पर अशा प्रकृतीच्याही पलीकडे असणाऱ्या आपल्याला नमस्कार असो.)

दत्तविद्याय लक्ष्मीश दत्तस्वात्मस्वरुपिणे |
गुणनिर्गुणरुपाय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||16||

*(अर्थ :- हे लक्ष्मीचे स्वामी दत्तात्रेय, ज्यांनी ब्रम्हविद्या दिली व आत्मस्वरूपाची प्राप्ती करुन दिली, ज्यांची त्रिगुणात्मक व त्रिगुणातीत अशी उभय रुपे आहेत, अशा आपल्याला नमस्कार असो.)

शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकम् |
सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोSस्तु ते ||17||

*(अर्थ :- हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे, तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रम्हानुभव देणारे असून याच्या पठणाने सर्व पापांचे शमन होते. हे दत्तात्रेय, आपल्याला नमस्कार असो.)

इदं स्तोत्रं महद्दिव्यं दत्तप्रत्यक्षकारकम् |
दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन् प्रकीर्तितम् ||18||

|| इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं  दत्तात्रेयस्तोत्रं संपूर्णम् ||
*(अर्थ :- हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्रीदत्तात्रेयांचे साक्षात् दर्शन करविणारे आहे. हे श्रीदत्तात्रेयांच्या कृपेने नारदमुनींनी रचले आहे.)
असे हे श्रीनारदपुराणातील श्रीनारदांनी रचलेले हे दिव्य श्रीदत्तात्रेयस्तोत्र पूर्ण झाले.


|| ॐ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त दत्त दत्त ||


॥श्री गुरुदेव दत्त॥

This information is taken from facebook page: